अमृत महोत्सव देशाचा रक्तदानाचा संकल्प रणगंधर्वचा, 175 जणांनी केले रक्तदान
बार्शी: स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून देशासाठी बलिदान देणाऱ्या प्रत्येक क्रांतीवीरांना स्मरण करण्यासाठी आणि युवकांमध्ये देशप्रेमाची मशाल तेवत ठेवण्यासाठी बार्शीतील सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या रणगंधर्व ढोल-ताशा-ध्वज पथकाच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात 175 रक्तदात्यांनी रक्तदान केले.


ह्या शिबिराचे उद्धाटन ज्यांनी आजपर्यंत तब्बल 125 वेळा रक्तदान केलेले रवींद्र भांगे व 101 वेळा रक्तदान केले अनिल ज्ञानमोटे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी वृक्ष संवर्धन समितीचे अध्यक्ष उमेश काळे यांनी केले.तद्नंतर बार्शीतील युवक-युवतींनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला.
शिबिर यशस्वी होण्यासाठी समर्थ सुरवसे,निखिल कानडे,शुभम शेटे,आशिष जंगम,प्रकाश जाधव,अजिंक्य कोल्हे,ऋषिकेश डोंगळे,सागर वायकुळे,सूरज पोकळे, रोहन खंबाळे, आकाश देशमुख, स्वप्नील व्हळे, गजानन काटकर, लखन जाधव, संकेत राऊत, मयूर जाधव,सचिन परदेशी, विजय काकडे, विरूपाक्ष वालवडकर, विशाल जमदाडे, शुभम जाधव, आदित्य ज्ञानमोटे, प्रविण जावीर, ओंकार डोके, रोहित घोलप,स्वप्निल शेटे,प्रथम बोंडवे, प्रीती करकर,गौरी सुरवसे,धनश्री निंबाळकर, कांचन क्षिरसागर, मोहिनी देवकर,यांनी परिश्रम घेतले.