औसा, बार्शीसह उस्मानाबाद जिल्ह्यातील ४ लाख शेतकरी वंचित
खा. राजेनिंबाळकर : शासनाने घोषित केलेली मदत मृगजळ
उस्मानाबाद, पुढारी वृत्तसेवा: यंदाच्या हंगामात सततच्या पावसामुळे पिके पाण्याखाली आहेत. त्यामुळे नुकसान झाले आहेच; शिवाय जिथे पीक बऱ्यापैकी तिथे चक्री भुंगा, गोगलगाय, यलो मोझॅक आदींच्या हल्ल्यामुळे मोठे नुकसान आहे. शासनाने जाहीर केलेली मदत मृगजळ असून अजूनही ३ लाख ८४ हजार शेतकरी मदतीपासून वंचित आहेत. लोकसभा मतदारसंघातील या शेतकऱ्यांना तातडीने दिलासा द्यावा, अशी मागणी खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी केली आहे.

मुख्य पीक असलेल्या सोयाबीन या पिकांवर मोठ्या प्रमाणात शंखी गोगलगाय, बोंडअळी, यलोमोझॅक आणि सततच्या पावसामुळे हजारो हेक्टरवरील सोयाबीन पिके हे पिवळे पडून विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव होऊन सर्व पिके शेतकऱ्यांच्या हाताबाहेर गेल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. त्यानंतर उर्वरित सोयाबीन पिकास खोडमाशी व चक्री भुंगा या किडींचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे सोयाबीन पिकामध्ये मर होत असून उर्वरित सोयाबीन पीक हे शेतकऱ्यांच्या हातातून केवळ नैसर्गिक आपत्ती व सततच्या पावसामुळे गेले आहे. प्रत्येक महसूल मंडळात

त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील सर्व तालुक्यांसह लातूर जिल्ह्यातील औसा, निलंगा आणि सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील सर्व महसूल मंडळांमध्ये जुलै ते सप्टेंबर महिन्यांमध्ये सततच पाऊस, शंखी गोगलगाय, यलो मोझॅक व खोडमाशीमुळे शेतकऱ्यांचे मुख्य पीक असलेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन स्वतः पाहणी केली. परिस्थिती आहे. सोयाबीन पिकाचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे.
या दौऱ्यासाठी तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी, तलाठी यांच्यासही तालुका कृषी विभागाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. तसेच या पाहणी दौऱ्यात कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी केली आहे.
50 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान असल्याचे सांगितले. वरकरणी सोयाबीन पीक हे हिरवेगार दिसत असले तरी फळधारणा नसल्यामुळे व किडींच्या प्रादुर्भावामुळे हजारो हेक्टरमधील सोयाबीन पीक हे संपूर्णत: वाया गेले त्यामुळे शेतकऱ्यांना मिळणारे उत्पन्न हे शून्य आहे. अशी परिस्थिती धाराशिव जिल्ह्यातील उर्वरित महसूल मंडळामध्ये तसेच लातूर जिल्ह्यातील औसा आणि निलंगा तालुका व सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील सर्व महसूल मंडळांमध्ये अशी सर्वांना लवकरात लवकर मदत करावी, अशी मागणी खा. राजेनिंबाळकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.