राज्यात २९३३ नवे कोरोना रुग्ण, तर १२३ रुग्णांचा मृत्यू
मुंबई, ४ जून: राज्यात आज १३५२ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून आतापर्यंत ३३ हजार ६८१ जण पूर्णपणे बरे झालेले आहेत. तसंच आज नव्या २९३३ रुग्णांची भर पडली व १२३ जणांनी आपला जीव गमावला आहे. त्यामुळे एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता ७७ हजार ७९३ इतकी झाली आहे. तर सध्या ४१ हजार ३९३ एक्टिव्ह रुग्ण असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

मागील २४ तासांमध्ये २९३३ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे रुग्णसंख्या ७७ हजार ७९३ इतकी झाली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ४३.२९ टक्के एवढे झाले आहे. राज्यातील मृत्यू दर ३.४८ टक्के राज्यात १२३ करोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ज्यापैकी ८५ पुरुष तर ३८ महिला आहेत. आज नोंद झालेल्या १२३ मृत्यूंपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील वयाचे ७१ रुग्ण होते. तर ४४ रुग्ण हे वय ४० ते ५९ वर्षे वयोगटातील होते. ८ रुग्णांचे वय ४० वर्षांखालील होते.
कोविड १९ च्या चाचणीसाठी आजपर्यंत पाठवलेल्या ५ लाख १० हजार १७६ नमुन्यांपैकी ७७ हजार २९३ लोकांचे नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या ५ लाख ६० हजार ३०३ लोक होम क्वारंटाइन आहेत. तर ३० हजार ६२३ लोक संस्थात्मक क्वारंटाइन आहेत.


राज्यात आज 2933 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता 77793अशी झाली आहे. आज नवीन 1352 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 33681 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 41393 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.
जगभरात कोरोनाच्या रूग्णांची संख्या ६४ लाखांच्या पुढे गेली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत ३ लाख ८५ हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेत कोरोनाचा सर्वाधिक परिणाम झाला आहे. येथे एकूण रुग्णांची संख्या १८ लाख ५० हजारांहून अधिक झाली आहे. तर १ लाख ७ हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान जगभरात कोरोनाच्या रूग्णांची संख्या ६४ लाखांच्या पुढे गेली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत ३ लाख ८५ हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेत कोरोनाचा सर्वाधिक परिणाम झाला आहे. येथे एकूण रुग्णांची संख्या १८ लाख ५० हजारांहून अधिक झाली आहे. तर १ लाख ७ हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.