सुशांतसिंह प्रकरणात देवेंद्र फडणवीसांची उडी केली ही मागणी वाचा……!
ग्लोबल न्यूज: अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर निर्माण झालेला वाद अधिकच वाढत असलेला दिसून येत आहे. एकीकडे बिहार पोलीस या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी महाराष्ट्रात दखल झालेले असताना राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी यावर भाष्य केले आहे.


राजपूत यांच्या आत्महत्ये प्रकरणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र पोलिसांऐवजी केंद्रीय यंत्रणांकडून तपास करण्याची गरज व्यक्त केली आहे. फडणवीस यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास केंद्रीय गुन्हे अन्वेषण CBI विभागाकडे सोपवण्यात यावा, अशी भावना मोठ्या प्रमाणावर सामान्यांमध्ये आहे.
तर दुसरीकडे भाजप नेते आशिष शेलार यांनीही सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणाचा तपास योग्य रितीने सुरु नसल्याचा आरोप केला आहे. केवळ संशयितांच्या नावाची चर्चा सुरु आहे, त्यांची चौकशी होत नाही.
त्यामुळे या प्रकरणाता तपास सीबीआयकडे सोपवावा, अशी मागणी आपण राज्याच्या गृहमंत्र्यांकडे करणार असल्याचे शेलार यांनी सांगितले. यासाठी आशिष शेलार आज गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भेट घेणार आहे