ग्रामपंचायत निवडणूक: बार्शीत मंगळवारी ५७७ उमेदवारी अर्ज दाखल  ,आज शेवटचा दिवस

0
444

ग्रामपंचायत निवडणूक: बार्शीत मंगळवारी ५७७ उमेदवारी अर्ज दाखल  ,आज शेवटचा दिवस

बार्शी:  बार्शी तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूकीसाठी मंगळवार दि. २९ रोजी ६८ गावचे ५७७ इतके उमेदवारी अर्ज दाखल झाले. आजअखेर ७४७ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. बुधवार दि. ३० रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आहे. अशी माहिती निवासी नायब तहसीलदार संजीवन मुंढे यांनी दिली.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा


मंगळवारी इर्लेवाडी येथील १, अलिपूर १०, अरणगांव २, आळजापूर ३, आगळगांव २, बळेवाडी ३, बावी २२, बाभुळगांव ९, बोरगांव खु १, भालगांव २०, भातंबरे १४, भोईंजे २७, भोयरे १, चारे २१, चिखर्डे २, दडशिंगे १, धामणगांव आ २, धामणगांव दु १६, धानोरे १४, ढोराळे १४, गाताचीवाडी/ फपाळवाडी ७, गुळपोळी १२, घाणेगांव ९, घोळवेवाडी ३, हिंगणी पा १६, जामगांव आ १४, कव्हे ४, कळंबवाडी पा ७, कळंबवाडी आ १, कासारी १३, कासारवाडी १७, कापशी ४, कांदलगांव ८, कुसळंब ५, कोरफळे ६, खामगांव १९,

खांडवी-गोडसेवाडी २२, लमाणतांडा-तांबेवाडी ६, ममदापूर १२, मळेगांव २, मालवंडी २, नारी-नारीवाडी १८, नागोबाचीवाडी-लक्षाचीवाडी १६, पाथरी २, पांढरी ११, पिंपळगांव धस १६, पिंपळवाडी ७, पिंपरी आर ३, पिंपरी पान १०, रातंजन ६, साकत १, सासुरे ११, सारोळे ९, सावरगांव १, सौंदरे १, शिराळे ११, शेळगांव आर १२, शेलगांव व्हळे १, श्रीपतपिंपरी १६, तडवळे या २, तावडी ३, तांदुळवाडी ४, तुर्कपिंपरी ११, उपळाई ठों ४, वाणेवाडी १, वालवड १८, यावली ७, झरेगांव १ अशा ५७७ उमेदवारी अर्ज दाखल झाले. 


२७  ग्रामपंचायतीसाठी मंगळवार अखेर एकही उमेदवारी अर्ज नाही 

वैराग, तुळशीदासनगर, मानेगांव, आंबेगांव, भानसळे, धोत्रे, इंदापूर, गोरमाळे, गौडगांव, हळदुगे, जामगांव पा, काटेगांव, कोरेगांव, खडकोणी, खडकलगांव, महागांव, मुंगशी आर, नांदणी, निंबळक, पांगरी, पिंपळगांव दे, पिंपळगांव पान, सर्जापूर, शेंद्री, उक्कडगांव-वाघाचीवाडी, उपळे दु, जहानपूर या २७ ग्रामपंचायतीसाठी अदयाप एकही अर्ज झालेला नाही.

वैरागसाठी नेतेमंडळी घेत आहेत खबरदारी 

वैराग ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर होण्याची प्रक्रिया प्रशासन स्तरावर सुरू आहे. दरम्यान, निवडणूक जाहीर झाली. ही निवडणूक रद्द करण्याची मागणीही झाली परंतु अदयाप तरी निवडणूक आयोगाने निवडणूक रद्द केलेली नाही.  आजही शासकीय धान्य गोदाम येथे थांबून होते. वैरागमध्ये अदयापतरी एकही अर्ज दाखल झालेला नाही. 

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here