राहुल गांधी यांचा मुख्यमंत्र्यांना फोन, कोरोना लढाईत आम्ही आपल्या सोबत
राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असताना दुसरीकडे महाराष्ट्रात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. एकीकडे महाविकास आघाडीची नियमित आढावा बैठक होत आहे. तर दुसरीकडे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरु चर्चा केली आहे.
कोरोना लढाईमध्ये आम्ही आपल्यासोबत आहे. राज्यात कोरोना कमी करण्यासाठी सर्व प्रयत्न करु”, असं राहुल गांधी म्हणाले. राहुल गांधी यांच्या या संवादामुळे महाविकास आघाडीत काहीसं तणावाचं बनलेलं वातावरण निवळण्याची चिन्हं आहेत. राहुल गांधी यांनी कालच केलेल्या विधानाने महाविकास आघाडीतील संभ्रम आणखी वाढला होता.
“आम्ही महाराष्ट्रात सरकारला पाठिंबा दिला आहे पण आम्ही मुख्य निर्णयकर्ते नाही”, असं राहुल गांधी म्हणाले होते. दरम्यान, कोरोना संकटात भाजप नेते महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची मागणी करत आहेत, तर आधी गुजरातमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करा, असं शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले.

त्यातच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आम्ही महाराष्ट्रात सरकारला पाठिंबा दिला आहे पण आम्ही मुख्य निर्णयकर्ते नाही, असं म्हटल्याने अस्थिरतेबाबतच्या चर्चांना उधाण आलं होतं. मात्र आता राहुल गांधी यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधल्याने महाविकास आघाडीतील कथित तणाव दूर होण्याची चिन्हं आहेत.
दरम्यान, महाराष्ट्र सरकारमधील ज्येष्ठ नेते आणि मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, कॉंग्रेस आणि महाविकास आघाडी (एमव्हीए) मधील अन्य घटकांमध्ये कोणताही फरक नाही. कॉंग्रेसलाही नाराजी नाही. आठवड्यातून एकदा तरी एमव्हीएची बैठक होते. त्यामुळे बुधवारच्या बैठकीत फारसा अर्थ उरला जाऊ नये.
राहुल गांधींनी मंगळवारी रात्री व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ट्विट केले की मीडियाने त्यांच्या विधानाचा गैरसमज केला आहे. राहुल गांधी म्हणाले की, जर भाजपला प्रश्न उपस्थित करायचे असेल तर ते करा. विरोधकांनीही लोकशाहीसाठी चांगले आहे असा प्रश्न उपस्थित केला पाहिजे. याचा फायदा सरकारला होतो. परंतु राज्यातील अध्यक्षांच्या राजवटीची मागणी करणे लोकशाही रचनेला उखडण्यासारखे आहे. खरं तर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारला काढून टाकून राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी भाजपकडून केली जात आहे.