मुंबईकरांच्या लॉकडाउन काळात होऊ शकते वाढ, आरोग्य मंत्र्यांचे सूचक वक्तव्य

0
270

मुंबईकरांच्या लॉकडाउन काळात होऊ शकते वाढ, आरोग्य मंत्र्यांचे सूचक वक्तव्य

सुरज गायकवाड

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

ग्लोबल न्यूज: देशात आणि राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसून येत आहे. इतर राज्यांच्या तुलनेत मुंबईसारख्या दाटीवाटीच्या शहरात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. दोनच दिवसापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला होता. त्याच वेळी प्रत्येक राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीचा अंदाज घेऊन शहरे पूर्वपदावर आणण्यावर एकमताने चर्चा झाली होती.

त्यात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मुंबई आणि शहरी भागांमधील लॉकडाउनचा कालावधी वाढवण्यात येईल अशी माहिती प्रसार माध्यमांना दिली आहे. त्यामुळे आता मुंबई, पुणे आणि नागपूर या प्रमुख शहरांमधील लॉकडाऊनचा कालावधी वाढण्याची शक्यता आहे.

   १५ एप्रिलपर्यंत राज्यातील करोना रुग्णांची संख्या कमी होण्याची आम्हाला अपेक्षा आहे. सध्या हा आकडा वाढत आहे. आपल्याला लॉकडाउनचा कालावधी काही आठवड्यांसाठी वाढवावा लागणार आहे. मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये लॉकडाउनचे निर्बंध सरसकट उठवले जाण्याची शक्यता कमी आहे,” असे मत आरोग्य मंत्री टोपे यांनी व्यक्त केले.

   तसेंच देशात लॉकडाउनची घोषणा करण्यापूर्वीच राज्य सरकारने दोन दिवसांपूर्वी 

लॉकडाउनची घोषणा केली होती. मुंबई सारख्या दाटीवाटीच्या शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखणे अधिकच कठीण आहे. असे मत टोपे यांनी व्यक्त केले आहे.

Best IT Comany In Maharashtra , Solapur