पुन्हा एकत्र येणार दोन जिवलग मित्र विलासरावांच्या शेजारी गोपीनाथ मुंडे यांचा पुतळा…! वाचा सविस्तर-

0
502

पुन्हा एकत्र येणार दोन जिवलग मित्र विलासरावांच्या शेजारी गोपीनाथ मुंडे यांचा पुतळा…!
        
माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि माजी केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्यातील मैत्रीचे किस्से अजूनही सर्वोश्रुत आहे. दोन्ही जरी वेगवेगळ्या पक्षात असले तरी त्यांनी राजकरणा पलीकडे आपली मैत्री जपली आहे.


 
आता देशमुख-मुंडे मित्रांची  जोडी लातुरात पुतळ्याच्या निमित्ताने पुन्हा एकत्र येणार आहेत. वेगवेगळ्या पक्षात, प्रसंगी एकमेकांच्या मदतीला धावून जाणारे पक्के मित्र म्हणून हे दोघेही परिचित होते. अगदी विद्यार्थी दशेपासून ते महाविद्यालयीन जीवनात देशमुख-मुंडे जोडीचे खुमासदार किस्से राजकारणात अजूनही ऐकवले जातात. अशा या मित्रांना आता पुतळ्याच्या रुपातही एकत्र आणण्याचा निर्णय जिल्हा लातूर परिषदेने घेतला आहे. जिल्हा परिषदेच्या आवारात देशमुख यांच्या शेजारीच मुंडे यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येणार असून तसा सर्वसाधारण सभेत सर्वानुमते ठराव मंजूर करण्यात आला आहे.
       
महाराष्ट्राच्या राजकारणात गोपीनाथ मुंडे आणि विलासराव देशमुख यांच्या मैत्रीचे किस्से त्यांच्या पश्चात देखील चर्चिले जातात. हे दोघे एका व्यासपीठावर येणे म्हणजे त्यांच्या चाहत्यांना एक पर्वणीच असायची.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

अगदी ग्रामपंचायतीपासून या दोघांच्या राजकारणाला सुरूवात झाली असली तरी त्यांची मैत्री मात्र त्याही आधीची म्हणजे महाविद्यालयापासूनची होती. दोघे पुण्याला शिकायला असल्यामुळे त्या काळातील गंमतीजमती हे दोघे एकत्र आल्यानंतर आपल्या भाषणातून सांगायचे.
       
राजकारणात या दोघांनीही मोठी उंची गाठली होती. आमदार ते राज्याचे मुख्यमंत्री आणि दिल्लीत केंद्रीय मंत्री होत विलासराव देशमुख यांनी त्यांच्या भाषेत सांगायचे झाले तर दोन्ही कडची हवा अनुभवली. तर गोपीनाथ मुंडेचा प्रवासही असाच होता. युती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री राहिलेले गोपीनाथ मुंडे पुढे मोदी सरकारच्या मंत्रीमंडळात ग्रामविकास खात्याचे मंत्री झाले. दोघेही नेहमी विरोधी पक्षात राहीले, पण पक्ष त्यांच्या मैत्रीच्या आड कधी आलाच नाही. पण या दोघांची खऱ्याखुऱ्या आयुष्यातील एक्झीटसुध्दा मनाला चटका लावणारी ठरली होती.

मंगळवारी सर्वसाधारण सभेत माजी समाजकल्याण सभापती संजय दोरवे यांनी हा ठराव मांडला.या ठरावाला काँग्रेस  पक्षातर्फे नारायण आबा लोखंडे, राष्ट्रवादी पक्षातर्फे माधव जाधव, भाजप तर्फे जिल्हा परिषद उपाध्यक्ष मा.  भारतबाई सोळुंके, बांधकाम सभापती संगीताताई घुले, महिला व  बालविकास सभापती  ज्योतीताई राठोड, कृषी व पशुसंवर्धन सभापती गोविंद चिलकुरे, समाजकल्याण सभापती रोहिदास वाघमारे, रामचंद्र तिरुके, डॉ.संतोष वाघमारे यांनी अनुमोदन दिले व  हा  ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.* पुतळ्यासाठी साठ लाख रूपये खर्च येणार असून राजकारणात कटुता वाढू नये या हेतूने तो उभारण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. राजकारणातील नव्या पिढीला या दोन मित्रांच्या पुतळ्यातून प्रेरणा मिळेल, असा विश्वास देखील जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे  यांनी यावेळी व्यक्त केला.

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here