मंत्री आदित्य ठाकरे यांच्या ट्वीटला नितेश राणे यांचे प्रतिउत्तर
ग्लोबल न्यूज: महाविकास आघाडी सरकार विरोधात भाजपने “मेरा आंगण, मेरा रणांगण” असे म्हणत ‘महाराष्ट्र बचाओ’चा नारा दिला आहे. आज विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजप नेत्यांनी मुंबईत भाजप कार्यालयाबाहेर काळे झेंडे घेऊन आंदोलन केले.

या भाजपच्या आंदोलनावर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी जोरदार टीका केली होती. ‘आज एका मोठ्या पक्षाच्या युनिटने खलाच्या पातळीचे राजकारण करून मोठा जागतिक विक्रम केला आहे. सध्याच्या कोरोनाच्या काळात संपूर्ण जग राजकारण, व्यक्तिगत वाद आणि हेवेदावे विसरून एकमेकांना मदत करत आहे.

मात्र हा एक असा पक्ष आहे ज्याने राजकारण करत समाजात भीती, द्वेष, आणि दरी निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. हा पक्ष राजकारणासाठी राज्या वर आलेली महामारी विसरला आहे, असे ट्विट आदित्य ठाकरेंनी केले होते.

याचाच धागा पकडत भाजप आमदार नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांना प्रत्युत्तर दिलं आहे. याबाबत बोलताना राणे म्हणाले, ‘खालील पातळीचा विश्वविक्रम याबद्दल बोलूच नये, कारण त्यांच्या मुख्यमंत्र्यांमुळे… महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्त रुग्णांची वाढती संख्या ही न्यूयॉर्कच्या बरोबरीने आहे. जर थोडी लाज असेल तर काहीतरी काम करा आणि आम्हाला या महामारीच्या संकटापासून वाचवा, असे राणेंनी म्हटलं आहे.